पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सेंद्रिय ते रासायनिक शेतीच्या प्रवासात देशी वाणांचे गमन

विसाव्या शतकातील सातव्या दशकाच्या मध्यंतरी घडून आलेल्या हरितक्रांतीने कृषिक्षेत्र चकाकून गेला. अन्नधान्याने भारत गदगद झाला. त्यासाठी सुधारित धानाच्या जातींचा सुध्दा मोठा हातभार लागला. याच सुधारित धानाच्या जातींनी ग्रामीण भागातला धानाचा पट्टा गाठला. सन १९७० च्या आसपास विसोरा परिसरातील शेतात संकरित धानाच्या वाणाने प्रवेश केला. जास्त उत्पादकता, रोग प्रादुर्भाव कमी असल्यामुळे संकरित वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आणि पाहता पाहता पारंपरिक धानाचे जुने वान धानाच्या कोठारातून हळूहळू गायब होत गेले.             नैसर्गिक तसेच मानवी पर्यावरणीय बदलाच्या प्रवासात सेंद्रिय शेतीने रासायनिक शेतीचे रूप धारण केले. मशागतीसाठी पारंपरिक साधनांच्या जागी आधुनिक यंत्रांनी जागा घेतली. त्यामुळे काळानुसार कमी उत्पादन, कमी पैसा मिळवून देणारे, रोग-किडिला बळी पडणारे पारंपरिक धानाचे वाण जास्त उत्पादन, जास्त पैसा मिळवून देणाऱ्या संकरित वाणाच्या गर्दीत दिसेनासा झाला. चवदार आणि पौष्टिक असूनही धानाचे जुने वाण आता लुप्त होण्याच्या वाटेवर आहेत. या पारंपरिक सूक्ष्मअन्नद्रव्यांनीयुक्त असलेल्या दे...

कोरोनाच्या धास्तीने जुन्या सवयींचा नव्याने स्विकार

पाहुणा म्हणजे जणू देवच. देवाच्या उपमेने सुशोभित पाहुणा घराच्या अंगणात येताच घरातल्या साऱ्यांच्या आनंदाला पारावर राहत नसे. लागलीच घरची स्त्री अतिशय आदराने लाकडी पाट आणि पाणी आणून द्यायची आणि पाहुणा लाकडी पाटावर उभा राहून हात-पाय-चेहरा पाण्याने स्वच्छ धुतल्यावर मगच घरात प्रवेश करीत असे. आसनस्थ अतीथीचे स्वागत म्हणून चुलीवर शीजलेली आंबील दिली जायची वा थेट जेवण दिले जायचे. अशाप्रकारे घरी आलेल्या पाहुण्याचा मानपान केला जायचा पण स्वच्छता सुद्धा राखली जायची. ही गोष्ट आहे आजपासून तब्बल चार-पाच दशकांपूर्वी पर्यंतची. कोरोना विषाणूच्या संक्रमणाला आळा बसावा म्हणून सुरू असलेल्या ब्रेक द चेन (लॉकडॉऊन) निमित्याने वयाची सत्तरी-ऐंशी गाठलेल्या महिला-पुरुषांशी गप्पा केली असता ते बोलते झाले.                मनात आठवणी दाटून आल्यावर वा विशिष्ट कामानिमित्त आपण नातलग, ओळख असलेल्यांच्या घरी पाहुणा म्हणून जातो. सत्तर वर्षांआधी जंगल अतिशय घनदाट, लोकसंख्या विरळ, गावे दूरदूर, रस्ते-पूल नाही, दळणवळण, संपर्क साधनांच्या अभावी अनेकअनेक दिवस, वर्षे आप्त-स्वकीयांची प्रत्यक्ष भेट होत...