पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दमा रुग्णांचा मुक्तीदाता वैद्यराज कावळे

मनात प्रामाणिकपणा आणि कसलाही स्वार्थ न बाळगता केलेली जनसेवा मानवास यशोशीखर गाठण्यास सदैव प्रेरणा देते. याच भावनेतून कोकडीचे वैद्यराज प्रल्हाद सोमाजी कावळे तब्बल 40 वर्षांपासून दमा रुग्णांना निःशुल्क औषध देतात. विशेष म्हणजे ही औषध मासोळीमधून देतात आणि फक्त मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी दिली जाते.             परंतु गेल्या वर्षी आणि यंदाही कोविड-19 च्या प्रादुर्भावाने जनहिताच्या दृष्टीने त्यांनी दमा औषध वितरित न करण्याचा निर्णय घेतला आहे            मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोकडी या गावी वैद्यराज प्रल्हाद सोमाजी कावळे दमा रोगावर मासोळीतून औषध वितरित करतात. गेली 40 वर्षे सातत्याने कोकडीचे वैद्य कावळे निःशुल्क दमा रुग्णांची निस्वार्थपणे सेवा करीत आहेत. आजपर्यंत लाखो दमा रुग्णांना त्यांनी दमा औषध दिली आहे. सलग तीन वर्षे औषध घेणे आवश्यक आहे. आजपर्यंत अनेक रुग्णांना दमा रोगातून मुक्त केल्याचे ते सांगतात. अल्पशिक्षित वैद्य प्रल्हाद कावळे गडचिरोली सारख्या जिल्ह्याच्या एका खेडेगावात र...

धान मळणीचा शेवट गोड करणारी संजोरी झाली लुप्त

अती दाट वनांनी व्याप्त गडचिरोली जिल्ह्यात आधीपासूनच चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे जास्त पावसात पिकणाऱ्या धानपीकाला या पट्ट्यातील शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती आहे. विसाव्या शतकातील पाचव्या दशकापर्यंत आजच्यासारखी अवघ्या काही तासांत कापणी-मळणी करून धानरास घरी पोहचवणारी अत्याधुनिक यंत्रे नव्हती. परिणामी पाच-दहा दिवस ते महिनामहिनाभर इथल्या धानपिकाची मळणी चालायची. अशावेळी शेतातील धानाचे झालेले उत्पादन आणि झालेल्या श्रमातून मुक्तता यांचा आनंद म्हणून साजरा करण्याचा, शेतातल्या खऱ्यावरचा अन्नग्रहणाचा उत्सव म्हणजे संजोरी. ही संजोरी गेल्या पाचदहा वर्षांपूर्वीपर्यंत शेतशिवारातील हरएक शेतात अगदी मजेत आयोजित होत असे. मात्र आता मानवनिर्मित तंत्रयुक्त वेगवान यंत्रांचा कृषी क्षेत्रात सुद्धा शिरकाव झाल्याने शेतावरल्या खऱ्यावरची धानपिक मळणी आणि मळणीचा शेवट अतीव गोड करणाऱ्या संजोरीची अस्सल गावरान मजा काळाच्या ओघात लुप्त झाली आहे.               विसावा शतक जसजसा पुढे जाऊ लागला तसतसे नवनवी मानवी संशोधने जगापुढे येऊ लागली. जणू संशोधनांची स्पर्धाच ! पण इथल्या ग्रामीण भागात या संश...

समृद्ध पर्यावरण

निसर्ग केवळ एकट्या मानवाचे नाही. हेच मनुष्य विसरत असल्यामुळे आपल्या परिसरात राहणाऱ्या ईवलाशा किटकापासून महाकाय हत्तीपर्यंत तर कुंडीतील वेलापासून आडदांड  वृक्षापर्यंतच्या साऱ्यांनी मिळून तयार होणाऱ्या पर्यावरणाचा बेभानपणे नाश करण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. मात्र आजही वडसा वनविभाग वडसा अंतर्गत येणाऱ्या वडसा रेंजमध्ये जमिनीवर तसेच पाण्यात राहणाऱ्या पाळीव प्राणी वा वन्यपक्षी, प्राणी आणि वनस्पती यांच्या वास्तव्याने येथील जैवविविधता श्रीमंतीत असून समृद्ध पर्यावरणाचा वास येथे आहे. आज (दि. 5 जून) जागतिक पर्यावरण दिन त्यानिमित्ताने पर्यावरणाप्रती जागृती आणि स्थानिक पर्यावरणाचा अनमोल ठेवा जपण्यासाठी माहिती देण्याचा हा प्रयत्न.               ज्या जंगलात बेडुक, रानकोंबड्या असतात त्या जंगलातील जैवविविधता समृद्ध असते. तर मोर ज्या जंगलात वास्तव्यास असते तेथील जैवविविधतेचा ऱ्हास होत असल्याचे लक्षण मानले जाते. विशेष म्हणजे, वडसा वनक्षेत्रात रानकोंबड्या आढळतात त्यामुळे येथील जंगलात समृद्ध जैवविविधता नांदते हे स्पष्ट होते. एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या...

स्वातंत्र्यापूर्वीच विसोरा येथे पोहोचली सायकल

     मानवी जीवनात आलेल्या आगंतुक संकटांशी मुकाबला करतांना डगमगणाऱ्या मनाचा आणि ढासळणाऱ्या शरीराचा सुयोग्य समतोल कसा सांभाळावा आणि प्रचंड आत्मविश्वासाने त्या संकटावर मात कशी करावी, हि शिकवण आपणास सायकल देते. निर्जीव असली तरी सजीव माणसाला सायकलचे अपार वेड आणि आकर्षण. आजपासून तब्बल पन्नास-साठ वर्षांपूर्वीपर्यंत सायकलची क्रेझ इतकी कि अख्खी पंचक्रोशी तीला पाहायला अतीव आतुर व्हायची. आज विसोरा गावात शेकडोच्या संख्येत सायकल आहेत. परंतु भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी सन 1940 च्या दरम्यान विसोरा गावात गोपाळ बुद्धे यांनी सर्वात पहिली सायकल आणली. आज (दि. 3 जून) जागतिक सायकल दिन त्यानिमित्ताने सायकल आणि तिच्याशी निगडीत विसोरा गावातील गोड आठवणींना दिलेला हा उजाळा.          स्वतःच्या वजनाच्या कितीतरी पट वजन वाहून नेणारी सायकल आकार, रुप कसेही असले तरीही जीवनात फार मोठे कर्तृत्व, उंची गाठता येते हे सिद्ध करते. एकापेक्षा अधिक माणसे तसेच वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायला सायकलचा वापर केला जायचा. आजही केला जातो. विसाव्या शतकाच्या नवव्या दशकापर्यंत सायकल म्हण...