पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विसोऱ्यात 136 वर्षांपूर्वीचा इंग्रजकालीन नाणा

 वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी सर्वमान्य चलनव्यवस्था निर्माण करण्यात आली. त्यातूनच नाणे, नोटा अस्तित्वात आल्या. भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी ब्रिटिश शासकाची चित्रे आणि नावे असलेली नाणे प्रचलित होती. स्वातंत्र्यानंतर ती सर्व नाणी चलनातून बाद होऊन लुप्त झाली. मात्र विसोरा येथील एकनाथ बुधाजी बुद्धे या कवीमनाच्या व्यक्तीने आजपासून तब्बल 136 वर्षांपूर्वीचे इंग्रजकालीन नाणे आपल्या घरी जपून ठेवले आहे. हे विशेष!                 भारत स्वातंत्र्यहोण्यापूर्वीच जन्मलेल्या एकनाथ बुद्धे यांना जुने नाणे, वर्तमानपत्राचे कात्रणे, चित्रपट गीतांच्या वह्या जमा करण्याचा अनोखा छंद आहे. त्याच छंदातून त्यांच्या सदन असलेल्या पूर्वजांच्या निमित्त्याने घरी एकोणिसाव्या शतकातील 1885 साली चलनात असलेले दोन आण्याचे नाणे आहे. त्यावर इंडिया व्हिक्टोरिया राणी असे नाव छापले असून राणीचे छायाचित्र पण आहे. तसेच 1908 सालचे एडवर्ड सातवा राजा आणि सम्राटचे छायाचित्र असलेले एक रुपी ज्यात डोक्यावरील मुकुट चिन्ह छापले आहे. वन क्वार्टर आणा इंडिया 1917 जॉर्ज पाचवा राजा, एक रुपये 1918 जॉर...

शंकरपटाचा धुराळा उडणार कां?

बैल हा कृषी संस्कृतीतील अत्यंत जिवापाड जपला जाणारा पूजनीय पाळीव प्राणी. त्याच बैलातील चपळाई, वेग आणि मनोरंजनापोटी बैलांच्या शर्यती म्हणजेच पूर्व विदर्भातील झाडीपट्टीच्या शंकरपट सुरू झाल्या. शंकरपटाला शतकोत्तर परंपरा आणि प्रचंड लोकप्रेम लाभले. शंकरपट म्हणजे झाडीपट्टीचा थरार नव्हे जणू उत्सव म्हणून साजरा केला जायचा. मात्र ग्रामीण संस्कृती आणि अर्थव्यवस्था बळकट करण्यात मैलाचा दगड ठरणारी शंकरपट बंद झाल्याने बैलप्रेमी, शंकरपट शौकिन हिरमुसले आहेत. पशुधन कमी झाले, पटाचा माहौल, मजा इतिहासजमा झाली. त्यामुळे झाडीपट्टीची शान आणि खरीखुरी ओळख असलेल्या शंकरपटाचा धूराळा उडणार का असा मानस पटप्रेमींनी व्यक्त केला आहे.                   गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा या चार जिल्ह्यांचा घनदाट झाडाझुडुपांचा भूपट्टा म्हणजेच झाडीपट्टी होय. तब्बल 58 लाख लोकसंख्येच्या आणि तीसहजारांवर चौरस किमी क्षेत्रफळाच्या या पट्ट्यात लक्षावधी हेक्टर जमीनीवर धानशेती केली जाते. यावरून आपणांस कळेल हा पट्टा म्हणजे निसर्ग पूजक, शेतीप्रेमी लोकांची खाण आहे ते. वीस वर्षांपूर्वी शे...

झाडीरंगभूमीच्या राजधानीत नाट्यचैतन्य

मंडई आणि नाटक म्हणजे झाडीपट्टीच्या लोकांचा सण. मनोरंजनाची लक्षावधी साधने असली तरी झाडिच्या रसिकांना नाटक पाहल्याशिवाय चैन पडत नाही. आता पुन्हा दुसऱ्यांदा आठ-आठ महिन्यांच्या निर्बंधानंतर नाटक हंगाम सुरू होण्यापूर्वीच शासनाने नाटक क्षेत्र खुले केले. झाडीपट्टी रंगभूमीची राजधानी देसाईगंज येथे नाट्य कंपन्यांचे दुकाने सजू लागली आहेत. नाटक तालमी सुरू झाल्या, नाटकांचे बॅनर झळकू लागले आणि नाटक बुकिंग सुरू झाल्याने नाटक हंगामाची जणू नांदीच सुरू झाल्याचे मानले जात आहे. एका महिन्यानंतर नाटकाचा पडदा उघडणार म्हणून निर्माता ते गाडीवाले आणि कलावंत ते रसिक या सर्वांत उत्सुकता वाढली आहे.                  मार्च 2020 मध्ये नाटकाचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना कोरोनाच्या महामारीने संचारबंदी लागली. या महामारीचा कलाकार अदृश्य आणि जीवघेणा असल्याने कोरोनारुपी नाट्याच्या प्रभावाने पहिल्यांदा जवळपास आठ महिने नाट्यक्षेत्र बंदिस्त झाले. त्यामुळे वर्ष 2020 मधील दिवाळी पासूनच्या हंगामाची ऑगस्ट-सप्टेंबरपासून सुरू होणारी पूर्वतयारी झालीच नाही. 4 नोव्हेंबर 2020 ला शासनान...