पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हरल्यामुळे अश्रू ढाळणारा बोंगा बैल

माणसामाणसांमध्ये असलेल्या खऱ्याखुऱ्या आणि जिवापाड प्रेमाची शोधाशोध चालली असतांना माणूस मात्र आपली माणूस जात सोडून इतर मुक्या जनावरांवर अस्सल स्नेह जपण्याचा जिवापाड प्रयत्न करतो. गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तहसीलमधील कोकडी या खेडेगावात राहणारे मोहम्मद जमाल गनी शेख यांनी आपल्या घरी विकत घेऊन आणलेल्या लाडल्या बोंगा उर्फ टकली उर्फ गनी (बैल) ला इतक्या मायेच्या ओलाव्याने सांभाळले की याच तरूणपणातल्या बैलाने अजेय वृत्तीने पंचक्रोशीतील बैल शर्यती गाजवल्या. अखेर बैलाच्या मृत्यूनंतर त्याच्यावरील प्रेमाखातर शेकडोंनी अंतिमविदाई देत त्याच्या कर्तृत्वाला सलाम केला.                कोकडी येथे वास्तव्यास असलेल्या मोहम्मद जमाल गनी शेख यांना शंकरपटाची मोठी हौस. याच हौसेने त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील चिखलगाव येथून वासरू घेऊन आणला. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर नंतर हाच बैल दोन दाती पण शिंग नसलेला म्हणून बोंगा आणि काही दिवसांत आलेले शिंग आखूड पण वक्र असल्यामुळे टकळी तर मालकाचे आडनाव गनी त्यामुळे गनी अशा तीन नावांनी ओळखला गेला. आपल्या मुलाबाळांव...

बैलबंडीतून वरात काढण्याची प्रथा आता झाली लुप्त

        दोन मानवी जीवांचे मनोमिलन घडवून आणणारा एक सामाजिक उत्सव म्हणजे लग्न. प्रेम या अडीच अक्षरी भावनेला आणखीनच दृढ करणारा अडीच अक्षरी शब्द म्हणजे लग्न ! लग्नात वर-वधू, कुटुंब, सगेसोयरे, शुभचिंतक, वऱ्हाडी या साऱ्यांशिवाय बैलजोडी आणि बैलगाडी यांचीही उपस्थिती अगदी प्रार्थनिय अशीच. याला कारणही तसेच. लग्नाचा केंद्रबिंदू असलेल्या नवरदेव, नवरीच्या वरातीची सारी भिस्त आणि आरास असायची बैलगाडीवर. मात्र मानवी बुद्धी आणि कल्पनेच्या तंत्रयंत्र बळावर अवतरलेल्या चारचाकी वाहनांनी बैलगाडीने निघणारी नवरदेवाची वरात पार पुसट करून टाकली आहे. होय, चारचाकी वाहनांमुळे दोन-तीन दशकांपूर्वीपर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येकच लग्नाची बैलगाडीतून काढली जाणारी वरातीची प्रथा आज लुप्त होत चालली आहे.             आजपासून तीसवर्षापूर्वीच्या आधी ग्रामीण भागात अगदी विरळ अशा जनसंख्येने वसलेली खेडी, वनव्याप्त जमीन अधिक, अल्पशिक्षित आणि अशिक्षित तरीही जीवन जगण्याची कला शिकलेले लोक असे चित्र होते. रोजच्या दैनंदिन वा सण-उत्सवाप्रसंगी नैसर्गिकपणा आणि पारंपरिकता जास्त. आधुनिकतेचा गंध...

रेडिओ ऐकण्यास सकाळपासून असायची लोकांची गर्दी

जागतिक रेडियो दिन (१३ नोव्हेंबर) रेडिओ ऐकण्यास सकाळपासून असायची लोकांची गर्दी # यावर्षीची थीम 'नवं जग, नवा रेडिओ' # विसोरा येथे ६० वर्षांपूर्वी आले पहिले रेडिओ # उद्धव परशुरामकर यांनी आणला रेडिओ विसोरा : दि. १२ (अतुल बुराडे)                एक वेळ अशी होती जेव्हा रेडिओ मानवी जीवनाचा खूप महत्वाचा भाग होता. माहिती आणि गाण्यांच्या माध्यमातून मनोरंजन म्हणून रेडिओकडे पाहिल्या जात होते. मात्र टीव्ही, संगणक, मोबाईल आणि त्यावरचे अनेकानेक मनोरंजक साधने अवतरल्याने रेडिओचा आधीसारखा वापर होत नसला तरी रेडिओचे महत्व कमी झालेले नाही. आजपासून तब्बल ६० वर्षांपूर्वी घनदाट अरण्यपट्ट्यात वसलेल्या तेव्हाच्या विसोरा गावात रेडिओसारख्या प्रसारमाध्यमाचे असणे श्रीमंतीचे सोबतच कुतूहल आणि औत्सुक्याचे होते. विसोरा येथे १९व्या शतकाच्या सहाव्या दशकात रेडिओ दाखल झाले. गेल्या साठ वर्षांत अनेकानेक तंत्र-विज्ञान बदलल्याने पूर्वीसारखे रेडिओचे बॉक्स आता दिसेनासे झालेत.                   सन १९६० च्या दरम्यान विसोरा येथील प्रतिष्ठित नागरिक उद...

हरपली विसोराच्या बैलांच्या जंगी शंकरपटाची मजा

हरपली विसोराच्या बैलांच्या जंगी शंकरपटाची मजा # विसोराची अनोखी शतकोत्तर परंपरा # संक्रांतीनंतरच्या तिसऱ्या गुरुवारी आधी शंकरपट आता मंडई मात्र यंदा पडला खंड # विसोरातील शंकरपटाचा झाडीपट्टीत होता माहौल # शंकरपट बंदीमुळे पट शौकीनांचा हिरमोड # दंडार, नाटक प्रयोगांची वैभवशाली परंपरा # कलाकारांना राजाश्रय देऊन व्हायचे दंडार, नाटक प्रयोग # अनेक नामवंत कलावंत आले विसोरात  अतुल बुराडे : विसोरा, दि. ३               लोकरंजन, मनोरंजन आणि स्वकीयांच्या भेटीगाठीतून लग्नगाठी या उदात्त हेतूने झाडीपट्टीत पूर्वी शंकरपट आता मंडई आणि दंडार, नाटक यांचा लोकोत्सव भरतो. झाडीपट्टी रंगभूमीला सजवतांना ज्या गावांनी जणू माहेरचा वाटा उचलला त्यात विसोरा गावाचा आवर्जून नामोल्लेख करावा लागतो. संक्रांतीनंतरच्या तिसऱ्या गुरुवारी होणाऱ्या विसोराच्या शंकरपट आणि दंडार, नाटकांना शंभरहून जास्त वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. मात्र गेल्या पाच-दहा वर्षांपासून शंकरपट बंद झाली आणि झाडीपट्टीतल्या विसोराच्या शंकरपटाची मजा हरपली. आता मंडई आणि नाटकांच्या माध्यमातून ही प्रथा टिकवली जात आहे. परंतु य...

कोवळ्या हृदयांना जुळविण्यात मोबाईल ठरतोय किंगमेकर

 व्हेलेंटाईन डे (१४ फेब्रुवारी) कोवळ्या हृदयांना जुळविण्यात मोबाईल ठरतोय किंगमेकर # ग्रामीण भागातही व्हेलेंटाईन डेची हवा  # मोबाईलमुळे जवळीकता साधण्यास मदत # सोशल मिडिया मंचावर प्रेमभावनांची शेअरिंग # आता स्क्रीन टु स्क्रीन गुलाबी फुलांची देवाणघेवाण # मागे पडली कागदी चिठ्ठ्यांची क्रेझ                  प्रेम म्हणजे मन आणि हृदयाला आनंद देणारी कोमलतम भावना. दोन जीवांना एकमेकांकडे आकर्षित करणारी मनोभावना. पुर्वीचे असो कि आताचे प्रेम म्हणजे प्रेम प्रेमच असले तरी व्यक्त होण्याच्या पद्धती अनेक पटीने बदलल्या. आधी आवड, आकर्षण, प्रेम वाटले तरी हृदयातल्या नाजूक भावना ओठांवर वा कागदांवर येऊन बाहेर पडणे अशक्यप्राय वा अनेक दिवस लागत. आता मात्र प्रेमभावना मनात निर्माण झाली काय लगेच मोबाईलच्या माध्यमातून फोन, शब्द, ईमोजी (चिन्ह) मधून व्यक्त केल्या जाते. इतके सहज सोपे प्रेम व्यक्त करणे झाले आहे. याकामी मोबाईल किंगमेकर ठरलाय. काही वर्षांपूर्वीपर्यंत महानगरांमध्येच सीमित असलेल्या व्हेलेंटाईन दिनाने आता खेड्यातल्या हृदयात प्रवेश केला असून शालेय वा महाव...