पोस्ट्स

40 वर्षांचा झाला विसोराचा तान्हा पोळा उत्सव

वर्षातील एकमेव असा सण ज्यात बालकांच्या आनंद आणि सहभागाला सर्वोच्च स्थान असते. बैलाच्या भगीरथ कष्टाला पूजन करून प्राणी आणि मानवाच्या नातेसंबंधात अधिकचा जिव्हाळा निर्माण करण्याचे सण म्हणजे बैल पोळा आणि तान्हा पोळा सण. बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी बालके लाकडी नंदी बैल सजवून त्याची पूजा करतात. आणि गावभर मिरवणूक काढतात. तान्हा पोळा सणाला बालकांकडून नंदी बैलाच्या निमित्त्याने बैलांची मनोभावे पूजन, वंदन, सन्मान केला जातो. केवळ तीन नंदी बैलांच्या साक्षीने आरंभलेला विसोरा गावचा तान्हा पोळा उत्सव आज (27 ऑगस्ट 2022) तब्बल 40 वर्षांचा झाला. गेली चार दशके पाहलेल्या विसोराच्या तान्हा पोळ्याने गावात बंधुता, एकात्मता आणि आपुलकीचा वसा जोपासला आहे.             विसोराचे रहिवासी माजी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सुखदेव मुंडले यांनी आपल्या मुलाच्या हट्टाला होकार देत लव्हा वाघाडे गुरुजी, किसन राऊत, बक्षी गूरूनूले, मारोती सुंदरकर यांच्या सहकार्याने सन 1983 साली तान्हा पोळा उत्सव सुरू केला. फक्त तीन नंदी बैल सजवून तीन मुलांच्या आनंदात लव्हा गुरुजीचा आवाज त्याला बक्षी गूरूनूले यांनी...

आई 'अस्मिता'च्या 'आकांक्षा'ला हवी मदत

आनंद आणि अस्मिता यांच्या सहजीवनातुन उमललेली आकांक्षा हि पंधरा वर्षांची मुलगी. आई-वडिलांच्या लाडक्या आकांक्षाची सहा दिवसांपूर्वी अचानक तब्येत बिघडली. डोक्यात दूखतेय एवढेच कारण ती सांगायची. लागलीच ब्रम्हपुरीच्या खाजगी दवाखान्यात उपचाराधीन असतांना परत काल-परवा तिने डोळे उघडणे, बोलणे बंद केल्याने नागपूरच्या शासकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले. उमलत्या किशोरवयात नवस्वप्न उराशी बाळगणाऱ्या आकांक्षाच्या आयुष्याचे गगन ठेंगणे होऊ पाहत आहे. तेव्हा देसाईगंज तालुक्यातील कसारी (तूकूम) या गावची रहिवासी आकांक्षा आनंदराव नेवारेचे आयुष्य उंच करण्यासाठी तीला तत्काळ उत्तम अशा वैद्यकीय उपचार आणि आर्थिक मदतीची गरज आहे. आज मदर्स डे आहे. त्यानिमित्ताने आई अस्मिताच्या आकांक्षाला मदत करण्याची नितांत गरज आहे.                  देसाईगंज ते कुरखेडा मार्गावर विसोरापासून अवघ्या दहा किमी अंतरावर कसारी (तूकूम) हे यशवंत गाव वसलेले आहे. याच यशवंत गावात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असलेल्या आनंदराव नेवारे यांचा कुटुंब राहतो. आनंदराव यांना एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी आकांक्षा...

पंतप्रधानांचे लग्न सोडून राष्ट्रसंत आंधळीत

गावखेड्यातील जनकल्याणातून अख्ख्या राष्ट्र, जगाच्या समृद्धतेची व्यापक अशी कृतीयुक्त दूरदृष्टी बाळगणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आजपासून तब्बल 70 वर्षांपूर्वीच घनदाट अशा झाडीच्या गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातल्या आंधळी गावात राष्ट्रसंत सतत सतरा वर्षे आले. राष्ट्रसंतांचे परमभक्त हरीराम खुणे यांच्याशी जुळलेल्या ऋणानुबंधापोटी राष्ट्रसंत आंधळी येथे येऊन भजन करायचे. आज सत्तर वर्षांनतरही आंधळी गाववासीय राष्ट्रसंतांची ग्रामगीता दररोज स्मरण करून त्यांच्या विचारांची स्मृती निरंतर वाहतात.               आईच्या गर्भात असतांनाच वडिलांचा मृत्यू झाल्याने वडिलांच्या प्रेमाला कायमचा मूकलेल्या आंधळी निवासी हरीराम खुणे यांचे बालपण बोळधा (बाराभाऊ) त गेले. तसेच शिक्षण ब्रम्हपुरी येथे झाले. हरीराम यांना गोड आवाज लाभल्याने ते भजन गायन उत्तम करायचे. त्याच अंगभूत गुणांनी राष्ट्रसंत यांच्याशी ओळख झाली. पुढे हीच ओळख इतकी घट्ट झाली कि हरीराम खुणे हे राष्ट्रसंत यांच्या भजनी मंडळात सहभागी झाले.    ...

जागृत देवस्थान आमगावचे राममंदिर

प्रभू श्रीरामावर अपार श्रध्दा आणि जिवापाड प्रेमाखातर बजरंगबली हनुमानाने अथांग सागरात सेतू बांधला. इकडे गडचिरोली जिल्ह्यातील आमगावच्या जंगलात आजपासून तब्बल शंभराहून अधिक वर्षांपूर्वी ब्रिजलाल पालीवाल या रामभक्ताने श्रीरामाप्रती असलेल्या श्रद्धेपोटी राममंदिर बांधला. आमगावच्या राममंदिरातून सेठ ब्रिजलाल यांनी उभारलेला रामभक्तीचा सेतू आणखी घट्ट होऊन सूदूर प्रसिद्ध झालाय. त्यामुळे दरवर्षी रामनवमी निमित्त जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील रामभक्त रामजन्मोत्सवाला आमगाव येथे श्रीरामाचा जयजयकार करण्यासाठी येतात.             आमगावचे रहिवासी, श्रीराम मंदिर आमगाव ट्रस्टचे सदस्य तथा माजी जि. प. सदस्य वसंतराव ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमगावच्या पूर्वेकडील घनदाट जंगलात राखडे महाराज यांचे वास्तव्य होते. ते सिद्धपुरुष होते. महाराजांची ख्याती खामखूरा (ता. अर्जुनी/मोरगाव, जि. गडचिरोली) येथील सेठ ब्रीजलाल पालीवाल यांच्यापर्यंत पोहचली. पालीवाल यांनी राखडे महाराज यांची आमगाव येथे भेट घेतली. पुढे राखडे महाराजांच्या सांगण्यानुसार पालीवाल यांनी आमगावचे तेव्हाचे मालगुजार केशवर...

शंकरपट म्हणजे झाडीपट्टीचा लोकोत्सव

शंकरपट म्हणजे झाडीपट्टीचा उत्सव. शेतकऱ्यांचा सण. शंकरपट आहे हे माहित होताच शेतकरी कामाला लागायचा. ज्याच्या घरी पटावर धावण्यासाठी बैलजोडी असायची ते स्वतःच्या पोटच्या पोराप्रमाणे बैलांची काळजी घ्यायचे. त्याची वज (पालनपोषण) करायचे. पट जशी पण जवळ येत होती तसतशी बैलाच्या जोड्या आणि त्यांची तयारी, सराव करून घेण्याची जी लगबग होती ती वाढायची. गावात चैतन्य तयार  व्हायचा. झाडीपट्टीतील  गावात शंकरपट आहे म्हटल्यावर नाटक आलेच. नाटक म्हटल्यानंतर पाहुणे आले आणि पाहुणे म्हटल्यानंतर पाहुण्यांचे मेजवानी आलीच. आणि विशेष बाब अशी की शंकरपट, नाटक म्हटल्यानंतर लग्न जुळण्यासाठी मुले आणि मुली पाहण्याचा एक आगळावेगळा कार्यक्रम यानिमित्ताने साधला जायचा.            खरिपाच्या हंगामातील धानपिकाची मळणी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापर्यंत चालू राहायची. याला कारण असे होते की, पूर्वी ट्रॅक्टर, मळणी यंत्र नसल्याने शेतकऱ्यांना शेतातील धानपिकाची कापणी झाल्यानंतर धानाची मळणी करण्यासाठी बैलजोडी, बैलगाडीचा वापर करावा लागत होता. त्यामुळे महिनोनमहिने मळणी चालायची. मळणी करून धानरास घरी येईपर्य...

किन्हाळावासीय जतन करताहेत राष्ट्रसंतांची प्रार्थना

समस्त समाज-राष्ट्राचे सर्वांगीण आरोग्य उन्नत करण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंतांनी मानवी शिक्षणाची शाळा म्हणजेच सामुदायिक प्रार्थना मानवी समुदायाला अर्पण केली. त्याच सामुदायिक प्रार्थनेची बहुमूल्य अशी शिकवण देसाईगंज तालुक्यात किन्हाळावासीय तब्बल 58 वर्षानंतरही जपत आहेत. विशेष म्हणजे, किन्हाळा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचार-प्रेरणेतून दररोज सामुदायिक प्रार्थना केली जाते. राष्ट्रसंत यांच्या भेटीने आणि स्पर्शाने पावन झालेला किन्हाळा गावात स्मृती दरवळत आहेत.             गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख नदी गाढवी नदीच्या काठावर वसलेल्या किन्हाळा गावातील  मोतीराम ठाकरे यांचे जोगीसाखरा येथील मानकर यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. त्या संबंधापोटी मोतीराम ठाकरे यांनी मानकऱ यांना आग्रह केला की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना किन्हाळा गावात, घरी भेट द्यायला आणा. मानकर यांनी मोतीराम यांचा शब्द मानला आणि योगायोगाने राष्ट्रसंत कुरखेडा तालुक्यातल्या आंधळी येथील हरिराम खुणे यांच्या घरी आले होते. महाराजांनी ठरवले की किन्हाळा येथे मोतीराम ठाकरे यांच्या घरी भेट द्यायची म्...

विसोऱ्यात 136 वर्षांपूर्वीचा इंग्रजकालीन नाणा

 वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी सर्वमान्य चलनव्यवस्था निर्माण करण्यात आली. त्यातूनच नाणे, नोटा अस्तित्वात आल्या. भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी ब्रिटिश शासकाची चित्रे आणि नावे असलेली नाणे प्रचलित होती. स्वातंत्र्यानंतर ती सर्व नाणी चलनातून बाद होऊन लुप्त झाली. मात्र विसोरा येथील एकनाथ बुधाजी बुद्धे या कवीमनाच्या व्यक्तीने आजपासून तब्बल 136 वर्षांपूर्वीचे इंग्रजकालीन नाणे आपल्या घरी जपून ठेवले आहे. हे विशेष!                 भारत स्वातंत्र्यहोण्यापूर्वीच जन्मलेल्या एकनाथ बुद्धे यांना जुने नाणे, वर्तमानपत्राचे कात्रणे, चित्रपट गीतांच्या वह्या जमा करण्याचा अनोखा छंद आहे. त्याच छंदातून त्यांच्या सदन असलेल्या पूर्वजांच्या निमित्त्याने घरी एकोणिसाव्या शतकातील 1885 साली चलनात असलेले दोन आण्याचे नाणे आहे. त्यावर इंडिया व्हिक्टोरिया राणी असे नाव छापले असून राणीचे छायाचित्र पण आहे. तसेच 1908 सालचे एडवर्ड सातवा राजा आणि सम्राटचे छायाचित्र असलेले एक रुपी ज्यात डोक्यावरील मुकुट चिन्ह छापले आहे. वन क्वार्टर आणा इंडिया 1917 जॉर्ज पाचवा राजा, एक रुपये 1918 जॉर...